जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज : भाई रामदास जराते


जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज : भाई रामदास जराते 
एट्टापल्ली :  बळजबरीने जंगल नष्ट करून खाणी खोदण्याविरोधात गेली अनेक वर्षे सातत्याने शेतकरी कामगार पक्ष, डावी लोकशाही आघाडी आणि ग्रामसभांच्या वतीने विरोध करण्यात येत असला तरी जिल्ह्याच्या भौतिक विकासासाठी आदिवासी नेत्यांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी केले.

सुरजागड येथील ठाकूरदेव यात्रेच्या दुसरे दिवशी जराते परिवार आणि डाव्या आघाडीच्या वतीने सहविचार बैठक आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी मंत्री, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले कि, अपवादात्मक कारणे वगळता आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची जोपासना करत विकास करण्यावर भर असून ठाकूरदेव देवस्थानासह एट्टापल्ली तालुक्यातील विविध कामांसाठी मोठा निधी लवकरच खेचून आणणार असल्याची ग्वाहीही आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, हर्षवर्धनबाबा आत्राम, एट्टापल्लीचे तहसीलदार हेमंत गांगुर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रविंद्र ओल्लालवार, माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, शिवसेना (उबाठा) चे विवेक बारसिंगे प्रामुख्याने उपस्थित होते.

दरम्यान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्या हस्ते गाव गणराज्याचा संघर्ष नामक पुस्तीकेचे प्रकाशन करुन यात्रेत मोफत वितरण करण्यात आले. ग्रामसभांचे नेते आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक सैनू गोटा, गोपाल उईके, शिलाताई गोटा, ॲड. लालसू नरोटे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, सहसचिव काॅ. ॲड. जगदीश मेश्राम, काॅ. विनोद झोडगे, काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कूलवार, राहुल येमूलवार, प्रकाश बन्सोड, विनोद मडावी यांचेसह अनेकांनी जराते परिवार व डाव्या आघाडीच्या या उपक्रमाला भेट देऊन सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, संगिता चांदेकर, विद्याताई गोहणे, भाई चंद्रकांत भोयर, बाजीराव आत्राम, योगेश चापले, अक्षय कोसनकर, चिरंजीव पेंदाम, सतिश दुर्गमवार, आकाश आत्राम, लक्ष्मण वेळदा, रमेश आतलामी, राजेश तलांडे, सुरज ठाकरे, आशिष नेवारे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments