एटापल्ली तालुक्यातील पैमा व अहेरी तालुक्यातील वेडमपायली या दोन तालुक्याला जोडणारा रस्ता केव्हा होणार
डॉ, प्रणय भाऊ खुणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना*
गडचिरोली
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम,अति जंगलव्याप्त,पैमा व अहेरी तालुक्यातील वेडमपायली
या गावांना राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली व या भागातील नागरिकांसोबत संवाद साधला व चर्चा केली यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी एटापल्ली आणि अहेरी तालुक्याला जोडणारया या बहुप्रलंबित
रस्त्याबद्दल सविस्तर चर्चा केली व सांगितले आधीच या गावांमध्ये रोजगाराच्या खूप मोठा वाणवा आहे त्यामध्ये एटापल्ली तालुक्यातून अहेरी तालुक्यामध्ये जाण्यासाठी दरवर्षी येथील स्थानिक नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो प्रामुख्याने पैमा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अहेरी येथे शिक्षण घेण्यासाठी जावे लागते परंतु विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यामध्ये महाविद्यालयात जाता येत नाही त्याचप्रमाणे येथे आधीच आरोग्याचा खूप मोठा बिकट प्रश्न असल्याने अहेरी तालुक्यामध्ये आरोग्यसेवा करिता जावे लागते तेव्हा सुद्धा खूप मोठी कसरत येथील नागरिकांना करावा लागतो आज पर्यंत अनेक नागरिकांना रस्ता नसल्याने उपचारा अभावी आपले प्राण गमवावे लागले आहे आणि हे असेच सुरू आहे स्वातंत्र्याचे इतक्या वर्षानंतरही आजही दोन तालुक्याला जोडणारा हा रस्ता झाला नाही?
त्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली,?
यावेळी उपस्थित राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी या मागणीचा पाठपुरावा करून पैमा आणि येडमपाईली येथील नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले व लवकरच हा विषय आपण मार्गी लावू असे सांगितले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास, संघटनेचे भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर, राकेश भाऊ डोंगरवार, नितेश खुणे पजूभाऊ खुणे, व गावातील मुखीया महारु तलांडी, ऊंगा लेखामी, लुला तलांडी रैनू तलांडे,दुलसा मडावी, कोलू तलांडी, दानू तलांडी, शामराव हलामी, मधुकर आत्राम, बोडा तलांडी, विनू तलांडी, बोडा तलांडी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
0 Comments