पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी करता सज्ज व्हा- माजी गृहमंत्री अनिल देशमुख.

पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी करता सज्ज व्हा-
माजी गृहमंत्री अनिल देशमुख. 


गडचिरोली,
गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच गडचिरोली शहरातील चंद्रपूर रोडवरील हॉटेल लॅण्डमार्क येथील हॉल मध्ये पदाधिकारी बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे माजीगृहमंत्री तथा जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस शप नेते अनिल देशमुख, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे,प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा निरीक्षक अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार ,प्रदेश सरचिटणीस सुरेश पोरेड्डीवार,प्रदेश सरचिटणीस शरद सोनकुसरे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,प्रदेश चिटणीस एड. संजय ठाकरे,प्रदेश चिटणीस ओम शर्मा,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार ,महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत जिल्हाउपाध्यक्ष नईम शेख, प्रदेश युवक सरचिटणीस करण गण्यारपवार, युवक जिल्हाध्यक्ष हिमांशू देशमुख,प्रदेश उपाध्यक्ष विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस शप वृषभ गोरडवार, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हुसेन शेख, मान्यवर उपस्थित होते. यावेळी बैठकीला मार्गदर्शन करतांना अनिल देशमुख म्हणाले की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असून सुद्धा आज मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना खताच्या तुटवडयाचा सामना करावा लागत आहे.आणि गोसेखुर्द धरणातून विसर्ग होणार्‍या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा अतोनात नुकसान होतो मात्र भरपाई मिळाली नाही.शासनाने खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तसेच बोनस शेतकर्‍यांना मिळाले नाही. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था बघायला मिळत असून जिल्हा विकासात सर्वांगीण दृष्ट्या मागे पडत आहे. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे. त्याच बरोबर येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश संपादन करावे. स्थानिक नेतृत्वाला आघाडी बाबत निर्णय करण्याची पूर्ण मुभा असेल. तेव्हा योग्य तो निर्णय आपल्या सोईनुसार करण्यास हरकत नाही. तसेच डॉ. राजेंद्र शिंगणे माजी मंत्री यांनीही मार्गदर्शन करतांना सहकार क्षेत्रातील ताकत राजकारणातील अतिशय महत्वाचा भाग असून, अतुल गण्यारपवार यांचे रूपाने आपल्या जिल्ह्यात ती ताकत असून, मी सहकार क्षेत्र चांगल्या प्रकारे जाणतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या ताकदीचा उपयोग करून यश संपादित करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार बोलतांना जिल्ह्यातील संपूर्ण समस्यांची जाणीव करून दिली. शेतकर्‍यांना खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसून, शेतकर्‍यांना त्या सोबतच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच पक्षाला जिल्ह्यातील कानाकोपर्‍यात पोहोचवून शरदचंद्र पवार साहेबांचे विचाराचा प्रसार आणि प्रचार करून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नक्की यश संपादन करू तसेच पदाधिकारी यांनी त्या दृष्टीने कामाला लागावे असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय शृंगारपवार, चामोर्शी कृ.उ.बा.स.उपसभापती परमानंद मल्लिक,कोरची तालुका अध्यक्ष प्रताप गजभिये, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष राजू आत्राम,सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर भेंडारे,तालुका खरेदी विक्री उपाध्यक्ष मुरलीधर बुरे,माजी अध्यक्ष तालुका खरेदी विक्री संघ चामोर्शी गुरुदास चुधरी,अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, एटापल्ली तालुका अध्यक्ष संतोष समुद्रलवार ,आरमोरी सदाशिव भांडेकर ,धानोरा तालुकाध्यक्ष बाळू उंदीरवाडे,मधुकर चिंतलवार,चामोर्शी तालुका अध्यक्ष कबीर आभारे,गडचिरोली 
तालुका अध्यक्ष मनोहर भोयर,वडसा तालुका अध्यक्ष क्षितिज उके,वडसा शहर अध्यक्ष अशोक माडावार,  किसानसेल जिल्हाध्यक्ष सुरेश परसोडे, कुरखेडा तालुकाध्यक्ष राजन खुणे, चामोर्शी महिला तालुकाध्यक्ष कुंदा जुवारे,माजी नगरसेविका संध्या उईके, माजी नगरसेविका मीनल चिमुरकर, यांचेसह जिल्ह्यातील संपूर्ण प्रदेश पदाधिकारी तसेच बाराही तालुक्यातून जिल्हा कार्यकारिणी चे पदाधिकारी संपूर्ण तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, तसेच पक्षाच्या विविध सेल जिल्हाध्यक्ष व त्यांचे सर्व तालुकाध्यक्ष शहरअध्यक्ष महिला युवक सेवादल आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments